STAY WITH US

श्री विश्वहंस आयुर्वेद - निरोगी आयुष्य अविरत..!

डिप्रेशन...आजाराला आमंत्रण..!



ज्या देशांना उज्वल भवितव्य आहे,अशा पैकी आपला भारत देश एक आहे.आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक शक्ती यांसारखे इतर निकष लावले जातीलच परंतु महत्वाचा एक निकष म्हणजे आपल्याकडे असणारी 'युवा शक्ती'.ही युवा शक्ती स्वस्थ सदृढ व निरोगी असणे हीच प्रत्येक देशाची संपत्ती ठरते.
    तारुण्य अवस्था ही मनाची एक नाजूक अवस्था मानली जाते.या वयात मुलां-मुली मध्ये शारीरिक ,मानसिक व भावनिक बदल होत असतात.या काळात त्यांना योग्य दिशा व मार्गदर्शन मिळणे गरजेचे असते. असे झाले नाहीतर मुलांना अनेक कटू प्रसंगांना सामोरे जावे लागते.यावेळी काही मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढतो,काही एकलकोंडी होतात,वाईट संगतीचे मित्र मिळल्यानंतर अश्लिल चित्रपट पाहून हस्तमैथुन सारख्या सवयी लागतात,पालकांचे पटत नाही,प्रेमभंग होणें यातून डिप्रेशन आत्महत्या ची भावना निर्माण होते.अशा अनेक मनाच्या अवस्था तरुण मुलां-मुली मध्ये पाहायला मिळतात. ही सर्व मानसिक अनारोग्याची लक्षणे आहेत.
   सद्या इंटरनेट च्या माध्यमातून जग जवळ आले आहे.परंतु काही वयात येणाऱ्या मुलां-मुलीकडून मोबाईलचा वापर चुकीची माहिती मिळवण्यासाठी होत आहे.यामुळे ती चुकीच्या वळणावर जातात.यातूनच मुलांमध्ये शुक्रदृष्टी ची लक्षणे दिसून येतात.परंतु मुलांकडून ही लपवली जातात.परिणामी शरीरावर दुष्परिणाम झालेले दिसून येतात. अशक्तपणा, भूक मंदावणे,वजन कमी होणे,चेहरा व त्वचा निस्तेज  होणे,पोटात दुखणे अशी लक्षणे दिसतात त्याच बरोबर त्यांच्या मनावर देखील परिणाम होतो.यातूनच एकलकोंडीपणा वाढून आत्महत्या ची भावना निर्माण होते.
     अशा वेळी त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते व आयुर्वेदीय औषधी उपाय करून आपण त्यांना बाहेर काढु शकतो. अधिक ताण, चिंता,अचानक बसलेला धक्का यामुळे मानसिक आरोग्य बिघडते. यांसाठी आयुर्वेदात मानस चिकित्सा व सत्वावजय चिकित्सा सांगितली आहे.तसेच बस्ती व शिरोधारा सारखी पंचकर्म खूप उपयोगी पडते.शारीरिक व मानसिक व्याधींना आयुर्वेद चिकित्सा पध्दती हा एकमेव शुद्ध व रोगमुक्त करणारा पर्याय आहे.

डॉ सुमित साळुंखे (आयुर्वेदाचार्य)
भिलवडी जि. सांगली
मोबा.9822974748




संपर्क - डॉ सुमित साळुंखे Call :- 9822 974 748.

|ADVT|पोहचा जगभरातील ग्राहकांपर्यंत क्षणार्धात - सर्व डिजीटल सेवा / वेब पोर्टल्स करिता -Click here/Call- 9890 546 909