रोजच्या धावपळीत घरचा डबा खाण्या ऐवजी बाहेर मिळणारे वडा पाव ,समोसे, पिझ्झा,बर्गर,आंबवलेले पदार्थ,हॉटेलिंग पदार्थ या जंक फूड ला प्राधान्य दिले जाते.परंतु यांतून शरीराला आवश्यक असणारी पोषण मूल्य मिळत नसल्याने केवळ आजारांना निमंत्रण मिळते अशा पदार्थांमुळे वात पित्ता दी दोष बिघडून अनेक आजार तोंड वर काढू लागतात.
आपण आहार घेतल्यानंतर ,पचनानंतर त्यांचे दोन भाग होतात.सार भाग व मल भाग. सार भागापासून शरीरातील रसापासुन शुक्रा पर्यतच्या सात ही धातू चे पोषण होत असते. तर मल भाग शरीरातून बाहेर टाकला जात असतो. परंतु सध्याचे जंक फूड तसेच औषधी फवारणी केलेले अन्न द्रव्य यामध्ये सार भाग खूपच कमी असतो.मल भाग ही जास्त प्रमाणात निर्माण होतो.त्यामुळे शरीर धातूचे नीट पोषण होत नाही. त्यामुळे अतिरिक्त मल भाग शरीरात साचून राहतो. हेच सध्या पोटाचे निरनिराळे विकार निर्माण होण्याचे प्रमुख कारण आहे.
पोटाच्या बहुतांश विकारांमध्ये शारिरीक रचनात्मक विकृती नसून ती कार्यत्मक विकृती असते.अग्नी विकृती ही या मागचे कारण आहे.
1) अजीर्ण किंवा अपचन
2) पोट साफ न होणे
3) करपट ढेकर येणे
4) पोट गच्च होणे
5)छाती मध्ये व घसा मध्ये जळजळ
6) कडू आंबट उलटी होणे
7) पोट दुखणे
8) शौचास चिकट होणे
9) पित्ताची उलटी होणे
या सारखे पित्ताचे आजार उदभवतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष केले तर,
1)मूळव्याध
2) मूतखडा
3)पित्ताशय्यातील खडे
4) कावीळ
या सारखे आजार उद्भवतात
परंतु या गोष्टी कडे ही दुर्लक्ष झाले तर,
1)मधुमेह
2) रक्तदाब
3)हृदयाचे विकार
4) किडनीचे आजार
या सारखे आजार पचनाच्या तक्रारी मुळे उदभवतात
पचनाची छोटीशी तक्रार मोठया आजारांना उत्पन्न करू शकते.
या आजारांवर उपचार करण्यासाठी आयुर्वेदोक्त औषध उपचार,पथ्य पालन व पंचकर्म करणे गरजेचे आहे.
पंचकर्म मध्ये बस्ती व विरेचन यांचा चांगला उपयोग होतो.
डॉ सुमित साळुंखे(आयुर्वेदाचार्य)
भिलवडी जि. सांगली
मोबा.9822974748
संपर्क - डॉ सुमित साळुंखे Call :- 9822 974 748.
|ADVT|पोहचा जगभरातील ग्राहकांपर्यंत क्षणार्धात - सर्व डिजीटल सेवा / वेब पोर्टल्स करिता -Click here/Call- 9890 546 909