STAY WITH US

श्री विश्वहंस आयुर्वेद - निरोगी आयुष्य अविरत..!

*मणक्याचे ऑपरेशन टाळण्यासाठी आधुनिक आयुर्वेद उपचार*


आपले मानवी शरीर हे एकमेकांशी जोडले गेलेले संधीचे जाळेच आहे.कारण येथे अस्थी(हाडे),सिरा, स्नायू हे एकमेकांच्या सान्निध्यात असतात आणि जोडले गेलेले असतात.शरीराच्या हालचाली प्राकृत ठेवण्यासाठी अस्थि, सिरा स्नायू चे आरोग्य चांगले असणे महत्त्वाचे आहे.त्याच्यामध्ये बिघाड निर्माण झाल्यास हालचाली करण्यामध्ये कष्टता जानवते,वेदना जानवतात.अशा वेदानयुक्त शाररिक हालचालीमध्ये अस्थि व सांधे यांची महत्त्वाची भूमिका असते. आयुर्वेदानुसार अस्थि हा शरीरातील सप्तधातु पैंकी पाचव्या क्रमांक चा धातू आहे.शरीराचे धारण करणे हे या धातूचे मुख्य कर्म सांगितले आहे.
   अस्थि धातूच्या कार्यात बिघाड होऊ लागल्यास हाडे दुखणे,सांधे दुखणे,मान, पाठ,कंबर दुखणे, गुडघेदुखी, टाचदुखी असे इतर नाना प्रकारचे  वाताचे आजार डोके वर काढतात.या सर्व आजाराचे मूळ कारण वात दोष बिघडणे व बिघडलेला वात दोष अस्थि या धातूंशी व आजूबाजूच्या सिरा स्नायूशी निगडित राहणे हेच आहे. हे आपण सर्वांनी समजावून घेणे गरजेचे आहे.
   आता आपण पाहतो की सांध्यांचे दुखणे घेऊन येणाऱ्या रुग्णाची संख्या वाढली आहे.वृद्धावस्था असताना त्रास होणे समजू शकतो पण तरुण वर्गात व स्त्रियांना वाताचे आजार उदभवू लागले आहेत.आयुर्वेदानुसार *वाताचे* *८0* प्रकार वर्णन केलेले आहेत.प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार होणार वातविकार हा वेगळा असतो.परंतु लोकांना सांधे दुखायला लागले की संधीवात हा एकच प्रकार झाल्यासारखे वाटते.त्यामुळे वात विकारविषयी व्यवस्थित माहिती करून घेणे गरचे वाटत आहे...शरीरातील सर्व हालचाली वात दोष नियंत्रित करीत असतो.हा वात दोष बिघडल्यास हालचाली मध्ये वेदना जाणवतात आणि आजारास सुरुवात होते.वात दोषाचे उत्पत्ति स्थान हे मोठे आतडे आहे.तर त्याचे संचारस्थान सर्व शरीर आहे.ज्यावेळी वात दोष बिघडतो त्या वेळी मोठ्या आतड्याच्या कार्यात बिघाड जाणवून पोटाच्या तक्रारी निर्माण होतात.मोठया आतड्यात दुषीत वात निर्माण होतो
  वात दोष वाढल्याने शरीरात रुक्षता वाढते त्यामुळे दोन हाडांच्या मधील स्नेहाश कमी होतो.परिणामी हाडे एकमेकांवर घासली जातात त्यामूळे हाडांची झीज होते.हाडे ठिसूळ बनतात त्यामळे सांध्यांचे दुखणे वाढते.
     वातूळ पदार्थ खाणे,शक्तीपेक्षा जास्त काम,अपघात होणे,विषारी प्राणी दंश,शस्त्रकर्म,स्त्री गर्भाशय प्रॉब्लेम यामुळे वाताचे विकार..संधिवात, आमवात,पाठीच्या मणक्याचे आजार,वजन वाढणे,गुडघे दुःखी,कंबर दुःखी हे आजार वाढतात.
    अशा आजारावर आयुर्वेदाची  त्रीसूत्री उपयोगी पडते.
1) आयुर्वेदीय औषधपचार
2)पथ्यपालन
3)पंचकर्म
होय.
आयुर्वेदीय औषधपचार मध्ये रुग्णाच्या प्रकृतीनुसार चूर्ण, काढा, वटी,तैल यांचा उपयोग केला जातो
पथ्यामध्ये वातूळ पदार्थ बंद करून शरीराला बल देणारे पदार्थ खायला दिले जातात.
चिकित्साचे महत्वाचे सूत्र म्हणजे पंचकर्म होय.पंचकर्मात वात विकारात बस्ती व रक्तमोक्षण यांचा उपयोग केला जातो.तसेच अग्निकर्म,विधकर्म ,तैलधारा,लेप चिकित्सा यांचा उपयोग केला जातो.या वातविकार मध्ये आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सा चा अवलंब केलातर नक्किच विजय मिळवता येईल...!

*डॉ सुमित साळुंखे(आयुर्वेदाचार्य)*
   *भिलवडी जि. सांगली*
      *मोबा 9822974748*

संपर्क - डॉ सुमित साळुंखे Call :- 9822 974 748.

|ADVT|पोहचा जगभरातील ग्राहकांपर्यंत क्षणार्धात - सर्व डिजीटल सेवा / वेब पोर्टल्स करिता -Click here/Call- 9890 546 909