STAY WITH US

श्री विश्वहंस आयुर्वेद - निरोगी आयुष्य अविरत..!

कोरोना काळात अशी वाढवा रोगप्रतिकारशक्ती -नक्की वाचा

कोरोना काळात अशी वाढवा  रोगप्रतिकारशक्ती  -नक्की वाचा


कोरोना आजारात आयुष मंत्रालयाने सांगितलेल्या सूचना रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी व आपले आरोग्य  निरोगी ठेवण्यासाठी या काळात नक्कीच मदत होईल.

१ रोज सकाळी 30 मिनिटे व्यायाम करा.(सूचना:सूर्यनमस्कार व प्राणायाम घरच्या घरी करा.)

२.रोज सकाळी १० gm च्यवनप्राश खा.
(सूचना: मधुमेह रुग्णांनी वैद्यांचा सल्ला घ्या.च्यवनप्राश खाल्ल्यानंतर लगेच दूध पिऊ नका. पोटाच्या तक्रारी असतील तर वैद्यांचा सल्ला घ्या)


३. रोज केवळ गरम पाण्याचेच सेवन करावे. 
(सूचना:कडक उन्हाळा असल्याने कोमट पाणी पिले तरी चालेल.ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी वैद्यांचा सल्ला घ्या)



४. स्वयंपाक करताना हळद, जिरे, धने, लसूण इ मसाल्यांचा वापर करावा.


५. तुळस, दालचिनी, काळी मिरी, सुंठ आणि मनुका घातलेला काढा प्यावा. यात लिंबू रसदेखील घालू शकता.

(सूचना: पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी काळी मिरी टाळावी. ५-६ काळ्या मनुका गरम पाण्यात भिजवून त्या कोळून मग अन्य घटक त्यात घालून एकदा उकळी काढावी आणि मग घ्यावे. याचे सेवन सायंकाळी करणे अधिक लाभदायक आहे.हा आयुष काढा आपल्या जवळच्या आयुर्वेदाचार्य कडून आपल्या प्रकृतीनुसार तयार करुन घेतला तर जास्त लाभदायक ठरेल)

६. १५० मिली दुधात अर्धा चमचा हळद घालून दिवसातून १-२ वेळा प्यावे. 

(सूचना: या दुधाचे सेवन केवळ सकाळी रिकाम्या पोटीच करावे. अपचन असल्यास वा दूध पचत नसल्यास वैद्यांचा सल्ला घ्यावा.)

७. सकाळ सायंकाळी तिळाचे तेल/ खोबरेल तेल कोमट करून दोन्ही नाकपुड्यांत लावावे.

(सूचना: याकरता आपल्या दोन्ही करंगळ्यांचा स्वतंत्रपणे वापर करावा आणि आधी हात साबणाने स्वच्छ धुतलेले असावे.)

८. १ टेबल स्पून तिळाचे वा खोबरेल तेल कोमट करून तोंडात धरून  २-३ मिनिटे आत फिरवावे आणि थुंकून टाकावे. कोमट पाण्याच्या गुळण्या कराव्या. 

(सूचना: या सोबतच हळद + कोमट पाणी अशा गुळण्या कराव्या.) 

९ रसमाधव वटी व माधव रसायन वटी रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी वैद्यांच्या सल्ल्याने सेवन करावे
आयुर्वेदाचार्याच्या सूचना

वरील उपाय करत असताना आपल्या जवळील वैद्यांचा सल्ला घ्यावा.वर कंसात दिलेल्या सूचना या आयुर्वेदाचार्य च्या आहेत.प्रकृतीनुसार या उपाय मध्ये बदल होऊ शकतो. 
    नियमित व्यायाम,दोन वेळा जेवण,रात्रीची शांत झोप घ्या.हलका आहार घ्या.शिळे अन्न,दूषित मांसाहार,बेकरी पदार्थ,आंबवलेले पदार्थ,दही हे पदार्थ टाळा.
 मोबाईल चा वापर कमीत कमी करा.
शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करा.
आयुर्वेद जीवन पद्धती स्वीकारा व निरोगी रहा.


- डॉ.सुमित साळुंखे.(आयुर्वेदाचार्य)

Share this Article

संपर्क - डॉ सुमित साळुंखे Call :- 9822 974 748.

|ADVT|पोहचा जगभरातील ग्राहकांपर्यंत क्षणार्धात - सर्व डिजीटल सेवा / वेब पोर्टल्स करिता -Click here/Call- 9890 546 909