सूर्याची उष्णता वाढत असल्यामुळे शरीराकडून थंड पदार्थांची मागणी केली जाते ही मागणी आपण शीतपेय, काकडी, कलिंगड इतर फळांचे सेवन यांनी पूर्ण करू शकतो .
एवढा मर्यादित विचार पुरेसा ठरत नाही . उन्हाळ्यात काय खावं काय खाऊ नये?कसं वागावं?यासाठी आयुर्वेदात मार्गदर्शन आहे.
एखादा माणूस उन्हातून घरी आला की प्रथम सावलीत निवांत बसून शांत झाल्यानंतर त्याला थंड पाण्याने हात पाय धुतल्यानंतर थोडा गुळ+पाणी दिले जाते.
ही पारंपरिक पद्धत अाणि ति अतिशय योग्य आहे.
गुळामध्ये स्निग्धता अाहे, तृप्ती करण्याचं सामर्थ्य आहे. उन्हाळ्याचा प्रतिकार करण्यासाठी जे काही घ्यायचं ते आवर्जुन थोडसं गोड पाहिजे.
दही,ताक या गोष्टी स्पर्शाला शीत असल्या तरी अभ्यंतरत:उष्ण आहे त्यामुळे त्या टाळाव्यात.
सरबत
आपल्याकडे लिंबाला उन्हाळ्यात सगळ्यात जास्त मागणी असते. पण आंबट पदार्थ कालांतराने पित्ताची निर्मिती करतात .ही गोष्ट विसरली जाते .🍋उन्हाळ्यात लिंबू केवळ रूढीमुळे वापरला वजातो.त्यातही आपण भरपूर साखर/खडिसाखर आणि लिंबाचं प्रमाण कमी घेतल तर फायदा होतो.
आहार
लवणाम्ला कटूष्णानि व्यायामं च विवर्जयेत।च सु६
मिठाचे प्रमाण स्वल्प असावे.
तिखट ,मसालेदार, मिरचीचे, आंबट पदार्थ टाळावेत. आहारातले अति उष्ण पदार्थ ,मांसाहार टाळावेत.
व्यायाम
आजपर्यंत कधीही व्यायाम केला नसेल किंवा सातत्य नसेल तर उन्हाळ्याचा मूहुर्त धरुन सुरू करू नका.
मद्यपान
मद्यम् अल्पम् न वा पेयम् अथवा सुबहु उदकम्।च सु६
आयुर्वेदाने उन्हाळ्यामधे मद्यांवर पूर्णपणे बंदी घातली आहे.कारण मद्यांचा आंबटपणा उष्णता पित्त वाढवतो.
विहार
दिवा शीतगृहे निद्रा निशी चंद्राशुशीतले।व्यंजनै: पाणि संस्पर्शै:चंदनोदकशीतलै:।सेव्यमानो भजेदास्यां मुक्तामणिविभूषित:॥कानानी शीतानी जालानि कुसुमानि च।ग्रीष्मकाले निसेवेत मैथुनातविरतो नर:॥च सु६
दिवसांच थंड ,शीतल वातावरणात काम आणि रात्री चांदण्या रात्री छतावर झोप असावी, अंगाला चंदनाचं पाणी लावा.थंड माणिक मोत्याचे अलंकार वापरावे . थंड उद्याने, पाणी, शीतल फुले वापरावीत.
परंतु ब्रह्मचर्य कटाक्षाने पाळावे
एसी वापर जादा करू नका. एसीत बसल्यानंतर लगेच उन्हांत अजिबात जाऊ नका.आवश्यकता असेल तर अगोदर साध्या वातावरणाशी एकरूप व्हावे,नंतर टोपी,रुमाल यांचा वापर करून बाहेर पडावे.अंगात पांढऱ्या रंगाची सुती कापडे परिधान करावीत.
आहारमध्ये मूगडाळ,गाईचा तूप,भाकरी,काकडी,गाजर,,कांदा, लिबु 1 फोड, यांचा वापर करावा पचायला हलका आहार घ्यावा..उन्हाळ्यात इतर ऋतू पेक्षा जास्त पाणी जाते...माठातील पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा..धने टाकलेले ,वाळा टाकलेले पाणी प्यावे..याने शरीरातील उष्णता कमी होते..चंदनासाव,औदुंबर जलचा वापर वैद्याच्या सल्ल्याने करावा
पाणी पिताना तहान, भूक आणि अग्नीचा विचार नक्की करा.
- डॉ.सुमित रघुनाथ साळुंखे
आयुर्वेदाचार्य,पंचकर्म व योग तज्ञ
Mob 9822974748
संपर्क - डॉ सुमित साळुंखे Call :- 9822 974 748.
|ADVT|पोहचा जगभरातील ग्राहकांपर्यंत क्षणार्धात - सर्व डिजीटल सेवा / वेब पोर्टल्स करिता -Click here/Call- 9890 546 909