तरुण मुला-मुलींमध्ये सुंदर दिसणे, त्यासाठी वेगवेगळी उत्पादने वापरून पाहणे याची एक क्रेझच दिसून येते.बाह्य सौंदर्य हे पूर्णतः शरीरातील मेंटबॉलिसम वर अवलंबून असते.त्वचा हे सौंदर्य व्यक्त होण्याचे माध्यम आहे.शरीरात सातही धातू सारवान असतील तर शरीराची कांती सुंदर दिसते.रस व रक्त या दोन धातूंवर त्वचेचा पोत अवलंबून असतो.वरून क्रीम,साबण,लोशन वापरून त्याचा काही उपयोग होत नाही.
आजकालचे तळलेले,तिखट, आंबवलेले पदार्थ, मसालेदार,चमचमीत,पदार्थ खाण्याने रस रक्तातील उष्णता वाढून त्याचे प्रतिबिंब त्वचेवर उमटते.परिणामी
1)तारुण्यापिटिका / मुखदूषिका
2)चेहरा व त्वचा काळवंडने
3)डोळ्याखाली काळी वर्तुळे येणे
4)चेहऱ्यावर वांग उठणे
5)चेहरा व त्वचेवर सुरकुत्या पडणे
6)मुरूम व काळे डाग येणे
असे परिणाम दिसतात.
मुलींमध्ये फास्टफूड खाणे पावभाजी,वडा पाव,भेळ,पाणीपुरी,समोसा असे जंक फूड अधिक प्रमाणात खाल्ल्याने मासिक पाळीच्या तक्रारी उद्भवतात तसेच तारुण्यापिटिका येणे , केसांच्या तक्रारी,सौंदर्य विषयक इतर समस्या,पित्त वाढणे अशा तक्रारींचे प्रमाण वाढतच जाते.
हे सर्व आजार रस रक्तातील दोषांचे परिणाम स्वरूप आहेत त्यामुळे चिकित्सा करत असताना केवळ स्थानिक चिकित्सा करून फायदा होत नाही.तर संपूर्ण रक्त शुद्धीकरण व पित्त शमन करणारी आयुर्वेदिक औषधे वैद्यांच्या सल्ल्याने घेणे आवश्यक आहे.पथ्य पालन करून पंचकर्मच्या वमन, विरेचन, रक्तमोक्षण, बस्ती,नस्य तसेच विविध प्रकारचे लेप अशा माध्यमातून चिकित्सा घेतल्यास सौंदर्य विषयक तक्रारी पासून मुक्तता मिळू शकते.
डॉ .सुमित साळुंखे (आयुर्वेदाचार्य)
भिलवडी, जि. सांगली
मोबा.9822974748
संपर्क - डॉ सुमित साळुंखे Call :- 9822 974 748.
|ADVT|पोहचा जगभरातील ग्राहकांपर्यंत क्षणार्धात - सर्व डिजीटल सेवा / वेब पोर्टल्स करिता -Click here/Call- 9890 546 909