काय आहे आयुर्वेद ?




काय आहे आयुर्वेद ?
स्वस्थ व्यक्तींच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे व आजाराने ग्रस्त अशा रुग्णांना आजार मुक्त करणे असे अनमोल प्रयोजन असणारा वेद म्हणजे आयुर्वेद.....!
पथ्य हा जाचक सल्ला आहे ?
पथ्य हा जाचक सल्ला नसून रुग्णाने घेतलेल्या औषधांचा त्याला जास्तीत जास्त फायदा मिळवण्याचा मार्ग आहे.खरे पाहता कसदार अन्नातूनच शरीराची निर्मिती होते. त्यामुळे औषधाने आजार बरा होतो व पथ्याने नवीन उत्तम प्रतीचे शरीर तयार होते.व पुन्हा औषध मूळावर कार्य करतात.त्यामुळे आजार लवकर बरा होतो.
आयुर्वेद औषधी कशी असतात ?
आयुर्वेद औषधे ही प्रामुख्याने वनस्पती पासून तयार केलेली असतात.म्हणजेच ती अन्नासारखी असतात.त्यामध्ये कोणत्याही प्रकारची केमिकल्स नसतात.त्यामुळे या औषधांना अॅलोपॅथिक औषधासारखे दुष्परिणाम असत नाहीत व ही औषधे शरीराला अपाय न करता काम करतात
आयुर्वेदिक औषधांचा गुण यायला वेळ लागतो ?
खरे पाहता हा समज चुकीचा आहे.गुण उशिरा येणे किंवा लवकर येणे हे आजार किती जुना आहे,याच्यावर ठरते.आयुर्वेदिक औषधे ही आजाराच्या मुळावर कार्य करतात.आजार जेवढा जुना तसा त्याचा कालावधी वाढतो.व आजार नवीन असेल तर त्याला लगेच गुण येतो.त्यामुळे वेळ लागला तर आजाराचा समुळ नायनाट होतो.
- डॉ.सुमित रघुनाथ साळुंखे
आयुर्वेदाचार्य,पंचकर्म व योग तज्ञ
संपर्क - डॉ सुमित साळुंखे Call :- 9822 974 748.
|ADVT|पोहचा जगभरातील ग्राहकांपर्यंत क्षणार्धात - सर्व डिजीटल सेवा / वेब पोर्टल्स करिता -Click here/Call- 9890 546 909